पावसाळा मराठी निबंध Essay on Rainy Season in Marathi

Essay on Rainy Season in Marathi हा निबंध आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या शब्दांत लिहून देणार आहोत. तुम्ही यापैकी कोणताही निबंध तुमच्या परीक्षेमध्ये वापरू शकता.

आपल्यासोबत आनंदाचा प्रवाह आणि अलौकिक सौंदर्य घेऊन येणारा पावसाळा सर्वांनाच खूप प्रिय असतो. झाडेझुडुपे, पशुपक्षी आणि मनुष्य सर्वच या जीवनदायी ऋतूच्या आगमनाच्या प्रतीक्षेत हरवलेला असतो. मग जून महिन्यात या प्रतीक्षेला फळ मिळते आणि सर्वांच्या आवडत्या पावसाचे आगमन होते.

Essay on Rainy Season in Marathi

पावसाळा वर १० ओळीत मराठी निबंध 10 lines on Rainy Season Essay in Marathi

Set 1 is helpful for students of Classes 1, 2, 3 and 4.

  1. पावसाळा हा भारतातील तीन ऋतूंपैकी एक महत्वाचा ऋतू आहे.
  2. भारतात पावसाळा जून ते सप्टेंबरदरम्यान म्हणजे मुख्यतः आषाढ, श्रावण आणि भाद्रपद महिन्यात असतो.
  3. भारतातील तीन ऋतूंपैकी हा माझा आवडता ऋतू आहे.
  4. मानवांबरोबरच, झाडे, पक्षी आणि प्राणी सर्वच पावसाळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात.
  5. पावसाळ्यात पीक चांगले येते, म्हणून शेतकरीही आनंदी असतो.
  6. लहान मुले पावसात भिजण्याचा आनंद घेतात.
  7. पावसाळ्यात संपूर्ण वातावरण सुंदर आणि आकर्षक दिसते, आकाशात काळे ढग प्रवास करताना दिसतात, चारही बाजूंना हिरवेगार निसर्ग दिसतो.
  8. उन्हाळ्यामुळे तापलेल्या वातावरणात पावसाळ्यात गारवा येतो, विहिरी, नद्या पाण्याने भरू लागतात, झाडांना नवीन पालव्या फुटतात.
  9. परंतु, पावसाळ्यात बरेच संसर्गजन्य रोगही पसरतात, तर काही भागात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसानही होते.
  10. पण जल हेच जीवन आहे, म्हणून पावसाळा हा ऋतू आपल्यासाठी अमृतासमान आहे.

पावसाळा मराठी निबंध Essay on Rainy Season in Marathi (१०० शब्दांत)

Set 2 is helpful for students of Classes 5, 6, 7 and 8.

निसर्गावर हिरव्या मखमली गवताची चादर पसरवणारा आणि वातावरणात शीतलता घेऊन येंणारा पावसाळा तर सर्वांनाच आवडतो. म्हणून माणूस, पशुपक्षी सर्वच पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात. भारतात पावसाळा जूनपासून ते सप्टेंबरपर्यंत असतो.

उन्हाळाच्या असह्य उष्णतेनंतर पावसाळा सर्वांच्या जीवनात नवीन आशा आणि उत्साह घेऊन येतो. या काळात निसर्गाचे सौंदर्य अतिशय मनमोहक असते. पावसाळ्यात शेतात चांगले पीक येते, म्हणून शेतकरी खूप आनंदी असतात. लहान मुलांच्या उत्साहाला तर सीमाच नसते, पावसाच्या पाण्यात भिजून मुले पावसाचा आनंद घेतात.

पावसाळ्यात नद्या, तलाव, विहिरी आणि इतर पाण्याचे सर्व नैसर्गिक स्त्रोत पाण्याने भरून जातात, त्यामुळे लोकांची दिलासा मिळतो. एकीकडे पावसाळा सर्वांसाठी आनंद घेऊन येत असला तरी काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे लोकांचे मोठे नुकसान होते, तर काही ठिकाणी संसर्गजन्य रोग पसरतात. पण तसे असूनही पावसाशिवाय आपण आपल्या जीवनाची कल्पनाही करू शकत नाही, जल हेच जीवन आहे.


पावसाळा मराठी निबंध Essay on Rainy Season in Marathi (२०० शब्दांत)

Set 3 is helpful for students of Classes 9, and 10.

आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे, आपण पावसाशिवाय आपल्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. त्यामुळे प्रामुख्याने शेतकरी आणि इतर सर्वजणच या पावसाच्या आगमनाच्या प्रतीक्षेत असतात. भारतात या पावसाची सुरुवात जुन महिन्यात होते आणि सप्टेंबरपर्यंत हा पाऊस आपल्याला शीतलता प्रदान करतो.

नैसर्गिक सौंदर्य

पावसामुळे उन्हाळ्यामुळे निर्माण झालेली उष्णता नाहीशी होते आणि वातावरणात गारवा येतो. पावसाळा आला की निसर्ग आपले सौंदर्य दाखवण्यास सुरुवात करतो. झाडे आनंदाने डुलू लागतात, तर पक्षी आनंदाने गाणी गाऊ लागतात. आकाशात काळे ढग गर्दी करतात, कधी कधी आकाशात इंद्रधनुष्याचे सौंदर्य पाहायला मिळते, चारही बाजूंना गवताची हिरवीगार चादर पसरलेली असते आणि निसर्गाचे हे रूप पाहून मन प्रसन्न होते. सर्वत्र आनंदाचे वातावरण असते.

पावसातील आनंद

पावसाळ्यात लहान मुलांच्या आनंदाला तर सीमाच नसते. लहान मुले कागदाच्या होड्या बनवून पाण्यात सोडतात आणि पावसाच्या पाण्यात उड्या मारतात, हे एक रमणीय दृश्य असते. पावसाळ्यात नद्या दुथळी भरून वाहू लागतात, तर उंच डोंगरावर धबधबे तयार होतात. लोक धबधब्यांच्या या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्वतारोहण जातात.

पावसाचे तोटे

पावसाळा आपल्यासोबत आनंदाच्या सरी घेऊन येतो. पण पावसाळ्याचे काही तोटेही आहेत, कधी कधी संततधार पावसामुळे लोकांची घरे पडतात, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते आणि पूरपरिस्थितीही उद्भवते. काही ठिकाणी पावसामुळे साथीचे रोगांचा प्रादुर्भाव वाढतो आणि लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

आपल्याला शेती आणि सामान्य जीवनासाठी पाऊस खूप आवश्यक आहे. नक्कीच पावसाचे काही तोटे आहेत परंतु काही वेळा पावसामुळे नुकसान होत असले तरी पावसाशिवाय भूतलावावर जीवन अशक्य आहे, हे एक अटळ सत्य आहे.


पावसाळा मराठी निबंध Essay on Rainy Season in Marathi (३०० शब्दांत)

Set 4 is helpful for students of Classes 11, 12 and Competitive Exams.

आपल्यासोबत आनंदाचा प्रवाह आणि अलौकिक सौंदर्य घेऊन येणारा पावसाळा सर्वांनाच खूप प्रिय असतो. झाडेझुडुपे, पशुपक्षी आणि मनुष्य सर्वच या जीवनदायी ऋतूच्या आगमनाच्या प्रतीक्षेत हरवलेला असतो. मग जून महिन्यात या प्रतीक्षेला फळ मिळते आणि सर्वांच्या आवडत्या पावसाचे आगमन होते.

निसर्गाचे सौंदर्य

पक्षी आनंदाने मधुर गाणी गाऊ लागतात, झाडेझुडुपे आनंदाने डुलू लागतात, मुले उत्साहाने नाचू लागतात, तर बळीराजा चांगले पीक येईल या आशेने प्रसन्नतेने आनंदोत्सव साजरा करतो. उन्हाळ्याच्या उष्णतेमुळे झालेली अंगाची लाही लाही नाहीशी होते आणि अंतःकरणाला हवेतील शीतलता प्रफुल्लीत करते. हा सर्व अनुभव अतुलनीय असतो.

मग येतो श्रावणमास. या काळात निसर्गाचे सर्वोत्कृष्ट सौंदर्य पाहायला मिळते. सर्वत्र मखमली गवताची हिरवीगार चादर पसरते. पाऊस आणि ऊन यांच्यात स्पर्धा चालू असते आणि त्यामुळेच आपल्याला निसर्गाचे हे मोहक  सौंदर्य पाहायची संधी मिळते आणि म्हणूनच या सौंदर्याबद्दल बालकवींनी एक सुंदर रचना केली आहे.

“श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे;
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे.”

                                                -बालकवी

पावसाळा आणि सण

हा पावसाळा आपल्यासोबत केवळ सौंदर्यच नव्हे तर अनेक सण आणि उत्सवही घेऊन येतो, त्यामुळे पावसाचा हा आनंद द्विगुणीत होतो. नागपंचमी, रक्षाबंधन, गणेशोत्सव असे अनेक सण हा पाऊस आपल्या सोबत घेऊन येतो, त्यामुळे सर्वांच्याच मनातील आनंद आभाळाइतका होतो.

पावसाचे फायदे

पाऊस आपल्याला एक नवीन जीवन प्रदान करतो, कारण पावसाळ्यात नद्या आणि विहिरी तुडुंब भरतात, जमिनीतील पाण्याचा साठाही वाढतो आणि लोकांची पाणीटंचाईच्या समस्येतून सुटका होते. पावसाच्या दिवसात डोंगराळ भागात धबधबे वाहू लागतात, म्हणून लोक पर्वतारोहण करून या अद्भुत सौंदर्याचा अनुभव घेतात.

पावसाचे तोटे

एकंदरीत पाऊस लोकांचे जीवन आनंदाने भरून त्यांना नवीन जीवन प्रदान करतो, पण ही नाण्याची एक बाजू आहे. कारण पाऊस जेवढा आपल्यासाठी उपयुक्त ठरतो, तेवढाच तो काही वेळा आपल्या नुकसानाचे कारणही बनतो. अतिवृष्टीमुळे दरवर्षी कितीतरी लोक आपले प्राण गमावतात, शेतकऱ्यांचे नुकसान होऊन कितीतरी शेतकरी आत्महत्या करतात. काहीवेळा तर गावेची गावे नष्ट होतात. साथीचे रोग निर्माण होतात आणि लोकांचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक नुकसान होते. अशा प्रकारे प्रकृती जर आपल्यावर रुष्ट झाली तर मोठ्या प्रमाणात नुकसान करून जाते.

उपाय

तसे पहिले या नुसकांनालाही कारण मनुष्यच आहे, ज्याप्रकारे दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे, प्रकृतीचे संतुलन बिघडत आहे. त्यामुळे आपण निसर्गाला जपायला शिकले पाहिजे, तरच हा पाऊस आपल्यासाठी आनंदाचा पाऊस ठरेल.


पावसाळा मराठी निबंध Essay on Rainy Season in Marathi (४०० शब्दांत)

Set 5 is helpful for students of Classes 11, 12 and Competitive Exams.

वसंत ऋतुनंतर, उत्तरायण सुरु होते, त्यामुळे भीषण उष्णता पडते. त्या वेळी, पृथ्वी जळण्यास सुरुवात होते, झाडे झुडुपे सुकू लागतात, प्राणी आणि पक्षी इत्यादी सर्व गोंधळतात. उन्हामुळे नदी-नाले, तलाव-तलाव आणि समुद्र सुकण्यास सुरवात होते. हे पाणी बाष्पाचे रूप घेते आणि आकाशात उडते आणि थंड झाल्यानंतर ही वाफ ढगाळ होते आणि पावसाच्या रूपात पडण्यास सुरूवात होते. जेव्हा निळे निळे ढग गर्जना करतात तेव्हा ते आपल्या पाण्याद्वारे सर्व प्राण्यांना नवीन जीवन देतात,  मग पावसाळा सुरू होतो आणि जीवन या शब्दाचा अर्थ सार्थकी लागतो.

पावसाचे वर्णन

सामान्यपणे, पावसाळा हा आषाढ ते अश्विन पर्यंत असतो. यावेळी, समुद्रापासून वार्षिक मेघरेखा (मान्सून) उठते. ही रेखा उत्तरेकडे सरकण्यास सुरुवात होते; आणि हिमालयातील दाबामुळे पाऊस पडतो. त्यावेळी पर्वत अतिशय मोहक दिसतात. या पर्वतांवर आदळल्याने ढग पाण्याच्या रुपात बरसू लागतात. या चार महिन्यांत मुसळधार पाऊस पडतो. कधीकधी बर्‍याच दिवसांपासून पाऊस पडत असतो. दिवसही रात्रीसारखा दिसतो. सूर्याचे दर्शन दुर्मिळ होते. सर्व पृथ्वी जलमग्न होते आणि असे दिसते आहे की समुद्रात पूर आला आहे. पाऊस पडल्यानंतर आभाळात इंद्रधनुष्य खूप सुंदर दिसतात.

निसर्ग आणि प्राण्यांवर होणारा परिणाम

पाण्यामुळे आजूबाजूला हिरवळ दिसते. अनेक प्रकारचे नवीन प्रकारचे झाडे वाढतात. बाहेरील झाडे व द्राक्षवेली खूप आनंददायक आणि मोहक दिसतात. फळबागा, शेत आणि हिरवीगार मैदानांची अपूर्व छटा पाहायला मिळते. काळ्या-काळ्या फळांनी भरलेली जांभळाची झाडे, गोड रसाळ हिरव्या-पिवळ्या फळांनी भरलेली आंब्याची झाडे खूप सुंदर दिसतात. सर्व झाडाच्या वेली व झुडुपे पक्ष्यांच्या चिवचिवाटाने जिवंत होतात

घनानंदी मोराचा ‘मेहु मेहू’, आणि आंब्याच्या झाडावरील कोकिलचा ‘कुहू कुहू’ आवाज अनोखा संगीत तयार करतो. आकाशात पक्षांचे थवे बिनादरवाज्याच्या तोरणांसारख्या दिसतात. पावसांचे रात्रीचे दृश्य (पावसाळ्यात) खूप भयानक दिसते. रात्रीचा काळोख खूप भयानक दिसतो. भुंग्यांचे आवाज आणि बेडकांचे टर्र-टर्र कानी पडते. मधेच, विजांचा गडगडा हृदयास कंपित करतो आणि त्याचा प्रकाश डोळे विस्मित करतो ढगांची गर्जना तोफेच्या आवाजासारखी भासते. नद्या मोठ्या वेगाने आपल्या काठांना आणि वृक्षांच्या समूहांना कापत पुढे जातात.

पावसाचे फायदे

मानवी समाजाला पावसाळ्यापासून बरेच फायदे आहेत. कृषिप्रधान भारताचा पाऊस हा मुख्य आधार आहे. कोठेतरी पावसाचे पाणी धरणात थांबवून फायदा होतो. मारवाड प्रभृती ठिकाणी हे पाणी गोळा करून पिण्यास वापरले जाते. उन्हाच्या त्रासामुळे लोकांना आळशीपणा आलेला असतो पावसाच्या आगमनाने तो दूर जातो. पावसाचे विहंगम दृश्य मनावर चांगले परिणाम आणते.

पावसामुळे होणारे नुकसान

पावसाळा आपल्यासाठी खूप उपयुक्त असला तरी किटाणूच्या प्रादुर्भाव झाल्यामुळे हैजा, मलेरिया, हंगामी ताप इत्यादी गंभीर आजार उद्भवतात ज्यात अनेक माणसे मृत्यूही पावतात. कधीकधी मुसळधार पावसामुळे पूर येतो आणि गावे, घरे आणि पदपथ वाहून जातात. रस्त्यांना भेगा पडतात, पूल कोसळतात आणि बरीच कामे स्थगित होतात. अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान होते; घरे पडतात. कधीकधी, अनेक मनुष्य विजेच्या कारणामुळे अकाली मृत्युमुखी पडतात. रस्तांवर पाणी आणि चिखलामुळे घराबाहेर पडणे किंवा एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाणे खूप कठीण होऊन जाते. खेळासाठीही घराबाहेर पडता येत नाही. रात्री डासांमुळे झोप येत नाही. खरं म्हणजे जिथे पावसापासून आनंद होतो तिथे नुकसानही होते.

पण पावसाशिवाय आपण आपल्या जीवनाची कल्पना करू शकत नाही. म्हणून आपण निसर्गाला जपायला शिकले पाहिजे, तरच आपल्याला आपल्याला या पावसाचा आनंद उपभोगता येईल.


तर मित्रांनो, पावसाळा मराठी निबंध Essay on Rainy Season in Marathi Language हा निबंध तुम्हाला आवडलाच असेल तर तुम्ही तुमच्या मित्राला सुद्धा हा निबंध Share करू शकता, धन्यवाद.


Share:

About Author:

या ब्लॉगवर तुम्हाला निबंध, भाषण, अनमोल विचार, आणि वाचण्यासाठी कथा मिळेल. तुम्हाला काही माहिती लिहायचं असेल तर तुम्ही आमच्या ब्लॉगवर लिहू शकता.