जल प्रदूषण मराठी निबंध Essay on Water Pollution in Marathi

Essay on Water Pollution in Marathi हा निबंध आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या शब्दांत लिहून देणार आहोत. तुम्ही यापैकी कोणताही निबंध तुमच्या परीक्षेमध्ये वापरू शकता.

जल प्रदूषण ही समस्या पृथ्वीवर दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यामुळे प्राण्यांच्या आणि मानवी जीवनावर मोठे परिणाम होत आहेत. मानवी कृतीतून निर्माण होणार्‍या विषारी प्रदूषकांद्वारे पिण्याच्या पाण्याचे दूषित होणे म्हणजे जल प्रदूषण होय.

Essay on Water Pollution in Marathi

जल प्रदूषण वर १० ओळीत मराठी निबंध 10 Lines on Water Pollution Essay in Marathi

Set 1 is Helpful for Students of Classes 1, 2, 3 and 4.

  1. जल प्रदूषण ही पृथ्वीवरील एक गंभीर समस्या बनली आहे.
  2. कारखान्यातून निघणारी रसायने, प्लास्टिकचा वाढता वापर, शेतीमधील रसायनांचा वापर आणि इतर अनेक दैनंदिन मानवी कार्यांमुळे जल प्रदूषण वाढत आहे.
  3. जल प्रदूषणामुळे नद्यांमधील पाण्याची गुणवत्ता कमी होते आणि ते पिण्यायोग्य राहत नाही.
  4. जल प्रदूषणामुळे जलचर प्राण्यांचे जीवना धोक्यात येते.
  5. जल प्रदूषणामुळे अनेक साथीचे रोग पसरतात आणि त्यामुळे कॉलरा, टायफॉइड, कावीळ यासारखे रोग उद्भवतात.
  6. जल प्रदूषणामुळे अन्य प्राणी आणि वनस्पतींनाही धोका निर्माण होतो.
  7. जल प्रदूषण थांबवण्यासाठी लोकांना पाण्याचे महत्व पटवून दिले पाहिजे, त्यांच्यात जनजागृती निर्माण केली पाहिजे.
  8. कारखान्यांना सांडपाणी नदीमध्ये टाकण्यापासून रोखले पाहिजे, लोकांना नदीत कचरा टाकण्यास बंदी घातली पाहिजे.
  9. प्लास्टिक वर पूर्णपणे बंदी आणली पाहिजे, नद्यांना वेळोवेळी स्वच्छ केले पाहिजे, जलशुद्धीकरणकेंद उभारून स्वच्छ पाणीच लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे.
  10. जल प्रदूषण रोखणे हे प्रत्येकाने आपले कर्तव्य मानले पाहिजे आणि त्यादिशेने प्रयत्न केले पाहिजेत.

जल प्रदूषण मराठी निबंध Essay on Water Pollution in Marathi (१०० शब्दांत)

Set 2 is Helpful for Students of Classes 5, 6, 7 and 8.

जल प्रदूषण ही समस्या पृथ्वीवर दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यामुळे प्राण्यांच्या आणि मानवी जीवनावर मोठे परिणाम होत आहेत. मानवी कृतीतून निर्माण होणार्‍या विषारी प्रदूषकांद्वारे पिण्याच्या पाण्याचे दूषित होणे म्हणजे जल प्रदूषण होय. औद्योगिक वसाहतीतून निघणारी रसायने, जनावरांचा कचरा, सांडपाणी आणि इतर मानवी क्रिया यासारख्या अनेक स्त्रोतांद्वारे नदी नाल्यांमधील पाणी प्रदूषित होत आहे.

दिवसेंदिवस मानवी लोकसंख्या वाढत आहे आणि त्यामुळे त्यांच्या गरजाही वाढत आहेत. पण दिवसेंदिवस समुद्रातील आणि भूभागातील पाण्याची पातळी कमी होत आहे. माणसाच्या भौतिक प्रगतीमुळे प्रदूषणाचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे आपण पाण्याची बचत करून जल प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्याची गरज आहे.या प्रदूषणामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, त्यांना अनेक प्रकारचे रोग होत आहेत. म्हणूनच जल प्रदूषणाला आळा घालणे खूप महत्वाचे झाले आहे.


जल प्रदूषण मराठी निबंध Essay on Water Pollution in Marathi (२०० शब्दांत)

Set 3 is Helpful for Students of Classes 9, and 10.

पाणी पृथ्वीवरील जीवनाचा सर्वात महत्वाचा स्त्रोत आहे. पाण्यामुळे पृथ्वीवर जीवन शक्य आहे. पाण्यामुळे पृथ्वीवर पर्यावरणीय संतुलनही कायम राहते. विविध मानवी प्रक्रियांसाठी आणि अनेक कामांसाठी पाणी खूप महत्वाचे आहे. जलद औद्योगिकीकरण आणि अनियोजित शहरीकरण यामुळे वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

दिवसेंदिवस पृथ्वीवरील ताज्या पाण्याची पातळी कमी होत आहे. पृथ्वीवर पिण्याच्या पाण्याची मर्यादित उपलब्धता आहे, परंतु तिही मानवी कार्यांमुळे प्रदूषित होत आहे. जल प्रदूषणामुळे पाण्याची गुणवत्ता खालावली आहे. ते पाण्याचे रासायनिक आणि जैविक वैशिष्ट्ये खराब करीत आहे हे जगभरातील सर्व वनस्पती, मानव आणि प्राणी यांच्या जीवासाठी अतिशय धोकादायक आहे.

जल प्रदूषकांमुळे प्राणी व वनस्पतींच्या अनेक महत्त्वपूर्ण प्रजाती नष्ट झाल्या आहेत. विकसित आणि विकसनशील अशा दोन्ही देशांवर परिणाम करणारी ही एक जागतिक समस्या बनली आहे. औद्योगिक कचरा, खाणी, शेती, मत्स्यपालन, विविध उद्योग, शहरी मानवी क्रियाकलाप, शहरीकरण, बांधकाम उद्योगांची वाढती संख्या, घरगुती सांडपाणी इत्यादी गोष्टी पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण करीत आहेत.

जहाजांच्या समुद्रातील अपघातांमुळे होणाऱ्या तेल गळतीमुळे हजारो जलचर मारले जात आहेत. खते आणि कीटकनाशकांच्या शेतीतील वापरापासून उत्सर्जित रसायनांमुळे पाण्याच्या प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. दिवसेंदिवस पाण्याची गुणवत्ता घटत आहे.

आपण पाण्याचे आपल्या आयुष्यतील महत्व समजणे आणि आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. पिण्याच्या पाण्याच्या विघटनाच्या प्रभावी पद्धतीची अंबलबजावणी करणे आवश्यक आहे. “जल हेच जीवन आहे, आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे”. हे आपण समजले पाहिजे. पाण्याचे प्रदूषण कमीत कमी करून आपण या वसुंधरेला प्रसन्न करणे ही आपली जबाबदारी आहे जे पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या योग्य सहकार्याने आणि समर्थनाद्वारे शक्य आहे.


जल प्रदूषण मराठी निबंध Essay on Water Pollution in Marathi (३०० शब्दांत)

Set 4 is Helpful for Students of Classes 11, 12 and Competitive Exams.

जल हेच जीवन आहे असे आपण म्हणतो कारण पृथ्वीवरील जीवनाची सर्वात महत्वाची गरज म्हणजे पाणी. म्हणूनच, पाण्याचा योग्य वापर करुन आणि त्याचे प्रदूषकांपासून संरक्षण करून संवर्धन करण्याची गरज आहे. आपले जलसंपत्ती अतिशय वेगात कमी होत आहे. आणि आपल्याकडे जो जलसाठा उपलब्ध आहे त्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे.

जल प्रदूषण हा संपूर्ण जगासाठी एक प्रमुख पर्यावरणीय आणि सामाजिक प्रश्न आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (एनईईआरआय), नागपूर यांच्या म्हणण्यानुसार, नदीचे 70 टक्के पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याचे नोंदवले गेले आहे.

कारखान्यांमधून बाहेर पडणारी रसायने आणि कचरा, सांडपाणी, घरगुती कचरा, शेतीत वापरली जाणारी रसायने, नदीत सोडले जाणारे निर्माल्य, मूर्ती विसर्जन अशा अनेक गोष्टींमुळे नदी आणि नाल्यांमधील पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. यामुळे नद्यांमधील पाण्याची गुणवत्ता कमी होत आहे.

हानिकारक रसायने, विरघळणारे वायू, विरघळलेले खनिजे आणि सूक्ष्मजीव यासह विविध प्रकारचे सर्व दूषित घटक पाण्यात विसर्जित ऑक्सिजनची पातळी कमी करतात आणि प्राणी व मानवांच्या जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम करतात. विरघळलेला ऑक्सिजन म्हणजे वनस्पती आणि प्राण्यांना जिवंत राहण्यासाठी आवश्यक प्राणवायू आहे आणि प्रदूषणामुळे या ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे या जलचरांचे जीवन धोक्यात आले आहे.

प्रदूषणामुळे अनेक प्रकारचे साथीचे रोग अस्तित्वात आले आहे, जे लोकांच्या आरोग्यासोबत खेळत आहेत. म्हणून नद्यांचे पाणी स्वच्छ व ताजे राहण्यासाठी आणि हे पाणी पिण्यायोग्य बनवण्यासाठी जागोजागी जलशुद्धीकरणकेंद्र उभारणे आणि लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देऊन त्यांना जल प्रदूषण रोखण्यासाठी प्रेरित करणे आवश्यक आहे. जल प्रदूषण टाळण्यासाठी सर्व उद्योगांनी प्रमाणित नियम पाळले पाहिजेत, प्रदूषण नियंत्रण मंडळाने कडक कायदे केले पाहिजे. सांडपाणी विल्हेवाटीची योग्य व्यवस्था केल्या पाहिजेत.

जगभरातील सर्व देश आपले पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी लढा देत आहेत. जरी ते नाले, नद्या, तलाव किंवा समुद्र असोत, मानवी वापरासाठी आणि पर्यावरणाचा मुख्य घटक म्हणून पाण्याचे उच्च प्रतीचे प्रमाण राखण्यासाठी देशांनी उत्तम उपाययोजना केल्या आहेत.

भारतातही अशा उपाययोजना कार्यरत आहेत, स्वच्छ भारत अभियानांतर्गत अनेक प्रणाली कार्यरत आहेत. परंतु सर्व सर्वसामन्य लोकांनीही या समस्येच्या गंभीरतेला समजून जल प्रदूषण रोखणे हे आपले कर्तव्य आहे असे समजून कार्य केले पाहिजे. आपण या धरतीमातेचे ऋण फेडण्यासाठी म्हणून तरी जल प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.


जल प्रदूषण मराठी निबंध Essay on Water Pollution in Marathi (४०० शब्दांत)

Set 5 is Helpful for Students of Classes 11, 12 and Competitive Exams.

पाण्याचे महत्व

पाणी हा पर्यावरणाचा एक अविभाज्य भाग आहे. पाणी आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे, म्हणूनच  म्हटले जाते की पाणी हेच जीवन आहे. पाण्याशिवाय पृथ्वीवर जीवनाची कल्पनाही करता येणार नाही. पाणी ही मानवाच्या मूलभूत गरजांपैकी एक आहे.

प्रगती आणि प्रदूषण

गेल्या दोन शतकांच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीमुळे मानवी जीवन खूप सोयीस्कर झाले आहे. औद्योगिक क्रांतीने लाखो लोकांचे जीवन सुखी केले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे माणसाचे सरासरी वय वाढत आहे आणि मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे.

या यंत्रांनी आणि क्रांतीने आपल्याला बरेच काही दिले आहे आपले जीवन खूप सुखमय केले आहे. परंतु आपण आपल्या सभोवतालच्या वातावरणाकडे नजर टाकल्यास हे लक्षात येते की ही प्रगती आपल्या निर्मळ निसर्गाला हानी पोहचवत आहे. प्रदूषण या हानिंपैकीच एक आहे आणि जल प्रदूषण हे प्रदूषणाचा एक गंभीर प्रकार आहे.

जल प्रदूषण – एक समस्या

पृथ्वीवर जीव अस्तित्वात आहेत ते पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या पाण्यामुळेच. पण मानवाने आपल्या या भौतिक आणि आर्थिक प्रगतीमुळे सर्वांच्या या मुलभूत गरजेचेच नुकसान करणे लावले आहे. या जल प्रदूषणामुळे लोकांच्या जीवनावर मोठा परिणाम झाला आहे.

जल प्रदूषण म्हणजे नदी, तलाव, तलाव, भूमिगत आणि समुद्राच्या पाण्यात असे पदार्थ आढळतात ज्यामुळे या पाण्याची गुणवत्ता कमी होते आणि ते वापरणेयोग्य राहत नाही. या कारणास्तव, पाण्यावर आधारित प्रत्येक जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो.

जल प्रदूषणाची कारणे

जलप्रदूषणाचे एक प्रमुख कारण म्हणजे उद्योगधंदे आणि व्यवसाय. आपले उद्योग आणि कारखान्यांमधून निघणारा रासायनिक कचरा थेट नद्या व तलावांमध्ये टाकला जातो. नद्यांमध्ये आणि तलावांमध्ये सोडला जाणारा हा कचरा खूप विषारी असतो आणि त्यामुळे नद्यांचे आणि तलावांचे पाणी विषारी होते.

नद्यांचे व तलावांच्या पाण्याचे दूषित झाल्यामुळे त्यामध्ये राहणारे जलचर प्राण्यांचे जीवन धोक्यात येते आणि हे पाणी पिण्यायोग्य नसल्याने आपल्याला पाणीटंचाईचा सामना देखील करावा लागतो आणि अनेक आजारांना तोंड द्यावे लागते त्यामुळे आपले आरोग्य धोक्यात येते. उद्योगांव्यतिरिक्त पाण्याची प्रदूषण होण्याची आणखीही अनेक कारणे आहेत.

काही ठिकाणी लोक दैनंदिन कचरा देखील नद्या, नाले व तलावांमध्ये टाकतात. आज लोक शेतीत रासायनिक खते आणि कीटकनाशके देखील वापरतात, ज्यामुळे पाण्याचे स्त्रोत मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहेत. जेव्हा नद्यांचे दूषित पाणी समुद्रात येते तेव्हा समुद्राचे पाणीही दूषित होते.

लोक आपले सगळे पाप धुतले जावे म्हणून नद्यांच्या पाण्यात स्नान करतात आणि नद्यांच्या पाण्याला मात्र दुषित करतात. लोक नदी किंवा तलावाजवळ कपडे व भांडी धुतात, त्यामुळे नदी आणि तलावांचे पाणी दुषित होते.

प्लास्टिकचा वापर वाढल्यामुळे लोक प्लास्टिकही नद्यांच्या पाण्यात टाकतात त्यामुळे प्लास्टिकचा ढीग जमा होऊन नद्यांमध्ये गाळ साचतो आणि शहरात पूर येण्याची शक्यताही वाढते. कधीकधी जेव्हा एखादा अपघात होतो तेव्हा जहाजांचे किंवा तेल समुद्रात पसरते, ज्यामुळे समुद्राचे पाणी दुषित होते. हे तेल समुद्रात सर्वत्र पसरते आणि जलचरांचे जीवन धोक्यात येते.

जल प्रदूषणाचे परिणाम

प्रदूषणामुळे नद्यांचे पाणी पिण्यायोग्य राहत नाही आणि आपले आरोग्य धोक्यात येते. दुषित पाण्याचे सेवन केल्यास एखाद्या व्यक्तीला कॉलरा, पेचिश, क्षय आणि पोटाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो त्यामुळे सर्व प्राणी आणि जलचरांचे जीवन धोक्यात येते. जल प्रदूषणामुळे अनेकदा पाणीटंचाईच्या अडचणीचा सामना करावा लागतो.

जल प्रदूषणावर तोडगा

जलप्रदूषण रोखण्यासाठी आपल्या सरकारने तातडीने पावले उचलली पाहिजेत. ज्या कारखान्यामुळे अधिक प्रदूषण होते त्यांना बंद करण्याचे आदेश जारी केले पाहिजेत. जे पाणी अशुद्ध असेल ते जलशुद्धीकरण केंद्रांची स्थापना करून त्यांच्या सहाय्याने पिण्यास योग्य बनवले पाहिजे.

शेतीत रासायनिक खतांच्या वापरापेक्षा सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले पाहिजे. घरगुती आणि दैनंदिन कचर्याची योग्य ती विल्हेवाट लावली पाहिजे. नदी किंवा तलावावर कपडे धुण्यास लोकांना बंदी घातली पाहिजे. जनावरांना तलावामध्ये धुण्यास रोखले पाहिजे.

शहरातील तसेच गावातील तलाव आणि नद्या वर्षात किमान एकदा तरी स्वच्छ करून तलावाच्या आसपासचा कचरा काढून टाकला पाहिजे.

सारांश

आजच्या काळात पाण्याचे प्रदूषण आपत्कालीन स्वरुपाचे आहे. अशा परिस्थितीत आपल्याला त्वरित मोठी पावले उचलावी लागतात. जर आपल्याला भविष्यात पाण्याचे स्रोत सुरक्षित ठेवायचे असतील आणि आपल्या देशातील लोकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी द्यायचे असेल तर आतापासून या समस्येवर मात करण्यासाठी आपण पावले उचलली पाहिजेत. जर आपण या प्रकरणात उशीर केला तर ते अधिक प्राणघातक असेल.


तर मित्रांनो जल प्रदूषण मराठी निबंध Essay on Water Pollution in Marathi Language हा निबंध तुम्हाला आवडलाच असेल तर तुम्ही तुमच्या मित्राला सुद्धा हा निबंध Share करू शकता, धन्यवाद.


Share:

About Author:

या ब्लॉगवर तुम्हाला निबंध, भाषण, अनमोल विचार, आणि वाचण्यासाठी कथा मिळेल. तुम्हाला काही माहिती लिहायचं असेल तर तुम्ही आमच्या ब्लॉगवर लिहू शकता.